Posts

Showing posts from February, 2020

कँन्डल मार्च पून्हा!

     गेले काही दिवस बळी गेलेल्या लेकींच्या सन्मानार्थ कि त्यांना श्रध्दांजली म्हणून गावोगावि कँन्डल मार्च काढले जातायत . आपल्या संवेदना व्यक्त करायचा हा मार्ग आपण अवंलबला आहे बस तेवढच ?     पण आपल्याला काही प्रश्न पडत नाहीत का कधी की या गोष्टी सातत्याने होत असतात .कधी  स्री म्हणून तर कधी अल्प- संख्याकं म्हणून तर कधी गरिब दुबळी लोक या अश्या अत्याचाराला बळी पडतात. याची कारण प्रत्येका च्या ठिकाणी वेगवेगळी असतात पण अस करणारे मात्र ताकदिने  ,पैस्याने,  मोठे असतात अन त्यांच्या लेखी ते जे करताहेत तेच योग्य आहे.        ईथेच आपली एकंदरीत समाजव्यवस्था जबाबदार ठरते.     मुली,सूना किंवा बायको या एक स्री म्हणून असल्या अत्याचाराला बळी पडतात, कधी तीने दिलेला नकार पचवता आला नाही म्हणून तर कधी हूंडा कमी पडला म्हणून तर कधी मूल होत नाही म्हणून तर कधी स्वयंपाक केला नाही,दारूला पैसे दिले नाही ,चारीत्र्यावर संशय अस कुठलही कारण चालत तीचा जीव घ्यायला .                        ...

आजोबा , "माय बाप"

         " घेता का याला जरा,मी तेवढी स्लीप भरतो." एक सत्तरीतले आजोबा दोन वर्ष वयाच्या नातवाला बाजूला उभ असलेल्या व्यक्ती कडे देत म्हटले.             सही करताच त्यांनी   त्याला परत आपल्या कडेवर घेतले.ते बाळ झोपेतून नुकतच उठल्या मुळे अधिकच रडत होते. तस त्याच कौतूक करत आजोबा म्हणाले तो फार शहाणा आहे,शांत आहे .माझ्या अंगावर आहे,तेवढ्यात त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आले तसा संदर्भ देत ते सांगू लागले ,"यानां माहीत आहे त्याची आई सहा महीन झाले निघून गेलीय."       हा सगळा संवाद आपसूकच माझ्या कानावर पडत होता आणि नकळत मी त्या बाळाच्या आईचा विचार करू लागले ,म्हणजे नक्की काय झाल असेल? ती एवढ्या छोट्या बाळाला सोडून का गेली ?            त्यात त्यांच्या घरात दुसर कुणीच नसेल का त्याला सांभाळणार कारण झोपलेल्या बाळाला ते सोबत घेऊन आले होते.        खरतर येरवी एखाद्या आईला बाळाला घेऊन काम करायची हतोटीच असते पण आज हे आजोबा त्याचे माय आणि बाप झालेत.