Posts

Showing posts from April, 2021

मी जबाबदार

Image
   सुंदर ,योग्य शिर्षक आणि मजकुरही . आपण नागरिक म्हणून शिस्त पाळली तर अनेक समस्या कमी होतिल किंवा समस्या निर्माणच होणार नाही.तुम्ही म्हणाल हे कस ? आपली लोक संख्या इतकी आहे कि मुठभर राज्यकर्ते किंवा प्रशासन काहि सगळ्या गोष्टिंच ,समस्यांच निराकरण करू शकत नाही आजची परिस्थिती पाहता हे तुम्हाला पटेल ही.       आधिच लाँकडाऊन बरया पैकी सर्वांनी पाळल पण नंतर करोनाची खिल्ली उडवली.न मास्क लावले ना सोशल डिस्टंसिंग पाळल ,हात धुतले की नाही कुणास ठाऊक.          आपण भारतिय लोक बरयाच बाबतित ग्रेट असलो तरी नियम पाळण तेहि काटेकोर आपल्याला फारस जमल नाहिच.      ज्या गावांत लोकप्रतिनिधि व गावकरयांनी मिळून स्व:ता सगळे नियम पाळलेत ,योग्य नियोजन केल ति गाव करोना मुक्त राहिलीत .          आपली लग्नं ,मरणं ,सोहळे आपणच साजरे करून एका घरात बरयाच लोकांना करोनाची लागण करून घेतली.          जस कुंभमेळा थांबला पण लाॅकडाऊन मधे दिलेल्या सुटिच्या वेळात अजुनही गर्दी करण थांबल नाहीय.     दुकानं ,भाजी बा...

ज्योतिबांचा शोध जारी

Image
       आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती .महात्मा हि पद्वि मिळण्या मागे त्यांच महान काम आहे यात कुणालाच शंका नसावी. मागच्याच महिन्यात सावित्रीबाईंची 10 मार्चला पुण्यतिथी झाली.त्या आधि 8 मार्चला जागतिक महिलादिन साजरा केला गेला, हो !  तो बरयाच प्रमाणात फक्त साजरा केला जातो बैलपोळ्या सारखा .म्हणजे सगळ जग साजरा करत म्हणून बायको,आई ,मैत्रिण यांना शुभेच्छा देऊन ,एखाद गिफ्ट ,बाहेर जेवायला नेण अस सगळ करून तिला एक दिवस पलको पे बिठाने जैसा फिल करवल जात. आपण हि भाळतो ,काहिनां कळत पण काय हरकत आहे एक दिवस स्पेशल फिल करायला. एक दिवस तर एक दिवस.    पण त्याच दरम्यान जगभरातल्या महिलांच्या कौटुंबीक,आर्थीक,सामाजीक व आरोग्यविषयक स्थितीची वास्तव माहीती समोर आलि.अनेक वर्ष दहावि /बाराविच्या परिक्षां मधे बोर्डात जास्त संख्येने, चांगल्या गुणांनी पास होणारया मुलि कुठे जातात हा प्रश्न विश्वास नांगरे पाटील त्यांच्या कवितेत विचारतात. मग हा प्रश्न त्या मुलिंना विचारण्यात येतो त्या पेक्षा तो त्यांच्या आयुष्यात येणारया  पुरूषाला विचारला जावा अस वाटत नाही का? मग ज्योतिबांचा शो...