Posts

Showing posts from September, 2020

आनंदाच दान (Smile 😊please)

Image
   आज सगळी कडे चिंतेच वातावरण आहे, कुठे मरणाची भिती तर कुठे नोकरी -धंदा गमावण्याची, तर कुठे आपल्या माणसानां गमावण्याच दु:ख.     हे सगळ जरी असल तरी निरागस मन ,कुठल्याही काळजी शिवाय जगणार बालपण एक आनंदाची ,हास्याची लकीर आपसूकच ओठावर घेऊन येत. न कसली चिंता न फिकीर .पोट भरल, झोप झाली की बास ही आपली हसतच असतात वर ती थोडही रडली की आपण त्यानां हसवण्या साठी काय ? काय ? करतो.  पण लहान मुल कसही असल अगदी बाळकृष्णा सारख लोभस किंवा शेंबड कळकट तरी त्याच्या निरागस चेहरया कडे बघून आपले ओठ हास्य लकीरी साठी जरा लांब होतातच. किती लोभस असत ना हे  हसू .विशेषत: मुलांच्या बाबतीत. त्यात कुठलाही देखावा ,वरवरच ,नाटकी अस काही नसत. खरतर अनोळखी मुल ही,  आपण रस्त्याने जाताना त्यांच्या कडे बघुन नुसती भुवई उंचावून  काय ? अस इशारयाने विचारल तरी काही लाजून तर काही बिंधात स्माईल 😊 देतात. अस मोठ्याच्यां बाबतीत नाही होत, ते आपल्या ओळख दाखवण्याचे तर्क काढत बसतात .  पण यातही खेड्यात शेतात जाणारया बायका पटकन स्माईल देतात हा माझा अनुभव आहे. असो ,तर एखादयाच्या गालावर  हास्य फुल...

डॅशिगं लेडी

Image
आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक व्यक्ति भेटतात पण काहिच आपल्या कायम स्मरणात राहतात.का येवढ्या गर्दित काहिच लक्षात राहत असतील?" काय असत त्यांच्यात ?"somthing special" होच ----         तर अशिच ही स्पेशल ,तुम्हि म्हणाल काय येवढ तिच्यात ? मी तिलाच डॅशिगं अस संबोधलय.  आज हि एका ग्रृप मध्ये होती ज्या "जनधनच "खात उघडायला आल्या होत्या ,चारपाच बायका असतिल .मस्त आपला नंबर येण्याची वाट बघत झाडा खाली बसल्या होत्या .हसण चालू होत.गप्पा चालू होत्या त्यांच्या भाषेत , वंजारी बोली आहे त्यांची,लोंणज त्यांच गाव.     "आधार कार्ड",  "मतदान कार्ड " यांची जमवा जमव चालू होती. यातली एक गटप्रमुखाच्या रोल मधे.शिकलेली एकही नाही पण आत्मविश्वास शिकलेल्यानां लाजवेल असा.          लाॅकडाऊन मध्ये काहीनां दर महिन्याला 500 रू.  जाहीर केलेय सरकारनी आणि तिच मिळवण्या साठी या आल्या होत्या.      त्यांच एकंदरीत काय चालूय हे बघतानां मजा वाटत होती.त्यांच्या बेफीकीर वृत्तीची ,बिनधास्तपणाची म्हणजे पैसा कमी असेल किंवा लाॅकडाऊन मुळे नसेलही काहीं जवळ ...

तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे

Image
  प्रश्न असा आहे कि विद्वानातला विद्वान उत्तर देऊ शकणार नाही ,अथवा कुणीही सामान्य माणूस उत्तर देऊन टाकेल कि तो सगुणच आहे ,त्याचे हे गुण दिसतातच की आपल्याला सृष्टीच्या चराचरात,तोच तर सुर्याला आपल्या साठी लाली देऊन नवी प्रभा आणतो,  पानांफुलांत कित्ती कित्ती रंग भरतो.प्रत्येकाचे वेगळे रूप ,वेगळे गुण .त्याला कित्ती वेळ लागला असेल हे सगळ निर्माण करायला ,म्हणजे विद्न्यान वादी लोकांन च्या दृष्टीने हे निरर्थक असेल ,त्याचे वेगळे विद्न्यान असेलही पण या निर्मीतीत अस काही आहे जे मानवाच्या (आत्ताही)अवाक्या पलिकडचे आहे.त्या जगनिर्मात्या ,सृष्टीकर्त्या परमेश्वराच्या रचनेत पंचतत्वां चे विशिष्ट स्थान आहे ,त्यात जल ,पाणी ,नीर हे आपना सर्व सजीवांचे जीवन आहे ,त्याचे ही चक्र वेगळे ,पाऊस, नद्या ,झरे ,धबधबे ,समुद्र ठाई ठाई माणसाने नतमस्तक व्हावे अशी निर्मिती.त्याच्या निर्मितीतल्या प्रत्येकाचे वर्णन करणे केवळ अशक्य.ते चित्रकाराच्या चित्रात बंदिस्त होत नाही कि कविच्या कवितेत . आकाशातले रंग वेगळे रंग धरणिचे वेगळे,गर्द हिरव्या वनराईचे ,अन पानोपानी रांगोळीचे,रंग पाण्याच्या तुशारांचे,रंग झरयाच्या पावित्र्...