Posts

Showing posts from May, 2020

पंढरीची वारकरी

Image
शांत आणि जरा गुढ वाटणारया आजीबाईंनां बघून त्यांच्या बद्दल जाणून घ्यावस वाटल आणि जरा लिहायचा प्रयत्न चालू आहे म्हणून त्यानां न विचारताच फोटो काढला.                                              ऐरवी म्हातारया माणसानां जरा बोलायच असत ,कुणि विचारपूस केली तर ते भरभरून बोलतात.यांच जरा वेगळच होत . त्यांच्या कडे बघून हसल तरी त्या फारसा रिस्पाॅन्स देत नव्हत्या . जनरल डब्बा होता म्हणून अंदाज लावण कठिणच होत कि त्यांची परिस्थीती नेमकी कशि आहे.थंडीचे दिवस होते तेव्हा अगदी गुंडाळून बसल्या होत्या मग मी सवईने बँगेत नेलेली एक शाल त्यांना दिली तर ती त्यांनी सिट खालची वायरची पिशवी काढून त्यात ठेऊन दिली वर चेहरा परत तसाच निर्विकारी.                                                      थोड्या वेळाने चहा वाला आला तर आजींनी त्याला एक चहा मागितला ,त्याने पैस्...

ब्लेम गेम

   लाॅकडाऊन मुळे होणारी स्थलांतरीत मजूरांची फरपट आपण सगळेच वर्तमानपत्र आणि विविध वाहिन्यांनवरील बातम्या मधून बघतो . आपल्या विकासाच्या कल्पनांवर प्रश्नचिंन्ह ठरावि एवढी विदारक स्थिती ,बायका काय अन लहान मुलं काय सगळ्यांचीच अवस्था मानवी मनाला चटका लावणारी.   हो पण सुरूवातिचे काही दिवसच असा भावनिक कमेंटस् चा पाऊस पडला जिथे आपल्या संवेदनशिल मनाचा देखावा आपण केला.आत्ता काय ते त्यांच बघतिल ,कुठे कोणी कस जाव हे ज्याच त्यानी ठरवाव .आपण आत्ता लाॅकडाऊन मुळे बोर झालो म्हणून ते कस शिथील कराव ,व्यायाम करता यावा,थोडफार शाॅपिंग करता याव,पार्लरस् उघडावित, विजबिल माफ कराव या आपल्या"माफक" फिकीरीत सध्या बिझी आहोत.      खरतर असच असण सोॆईच आहे कारण मी एकटा/एकटी काय करणार अस म्हणून आपण आपल्या विश्वात सगळी सुख उपभोगत आलोत आणि राहूही. त्यात त्या नाहीरे वर्गाचा सगळा मक्ता सरकार वा सामाजिक संस्थानीं घ्यावा असच जणू गृहीत धरल जात.      वर सल्ले देत सुटतो, सरकार चे निर्णय कसे चुकिचे आहेत, काय नियोजन व्हायला हव होत .      आपण नागरीक वा एक माणूसकी असलेले...

प्रेम आणि आई

  आत्ताच पाश्चात्यांचा म्हणतात तो मदर्स डे सगळ्यांनी साजरा केला,म्हणजे काहीनीं फक्त स्टेटस ठेवून आपल्या आयुष्यातील आलेल्या मातृतुल्य वा माया करणारया सगळ्या स्रियांचे आभार मानले ,त्यांचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे सांगीतले.      प्रेम आणि आई या दोन गोष्टी खर तर एक दिवस साजरया करणे अवघड पण त्या दिवसाचे औचित्य साधून त्या प्रेमाची जाणिव असल्याचा  व त्या व्यक्तींना त्यांच्या त्या प्रेमा साठी ऋण व्यक्त करण्याच्या उद्देषाचे हे छोटे छोटे प्रयत्न सुखावणारे ठरतात.      प्रेम निस्वार्थ प्रेम तुम्ही तिला दिसण्या आधी पासूनचे म्हणजे तिच्या उदरात तुमच्या अस्तीत्वाची चाहूल लागल्या पासून ती तुमच्यावर करत असते.      आई ,मदर,माय, माऊली,अम्मा,अम्मी या कुठल्याही संबोधनाने समोर येणारी आकृती पण प्रेम दर्शवनारीच असते अगदी मदर मेरी च्या कुशितल्या तान्हूल्या लेकरा सोबतची मुर्ती सिबंल आँफ लव.   आयुष्यात एक जन्म देणारी आई असते पण तुमच्या वर माया करणारी अनेक माणस आईच्या मायेने तुमच आयुष्य संमृध्द करत असतात.        कधी ती आज...

स्वार्थ न शोभणारा

      लाॅकडाऊन न आपल्याला मानवाच्या अनेक रूपाचे दर्शन घडविले , सेवा देणारे करोना योध्दा , भुकेल्या जीवानां अन्न पुरवणारे देवदूत, जीवावर उदार होऊन मदत करनारे सेवाव्रती.  अनेक चेहरयांचीं  अनेक नाव पण त्यात वसणार  प्रेमळ  मानवी मन.       ऐकी कडे लोक दुसरयाला मदत करायला पुढे येत होते तर दुसरी कडे या मदत करणारया देवदुतानांच लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागत होत.    अनेक ड्युटी करून आलेल्या काही डाॅक्टर, तर  दवाखान्यातला इतर कर्मचारी वर्ग  तसेच पोलिसांनाही या तिरस्काराचा सामना करावा लागला.       हे लोक आपल्या जीवावर उदार होऊन लोकांचा जीव वाचवण्या साठी रात्रंदिवस मेहनत करताहेत आणि अशा योध्द्यांचा सत्कार ,त्यांचा संन्मान करण्या ऐवजी स्वार्थाने बरबटलेले लोक त्यांचा बहिष्कार करताहेत.     प्रत्येकाने ऐवढे स्वार्थी होऊन स्वत:चाच जीव वाचवायचा ठरवला तर दवाखान्यात एक डाॅक्टर दिसणार नाही,नर्स इतर कर्मचारी हे कोणीच या महामारीच्या काळात दवाखान्यात दिसणार नाहीत.        आत्ताच काय ...

सबका साथ सबका विकास

           " ऐक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना" ही उक्ति घरातल्या बाई पासून ,सरकार,आणि जागतिक आरोग्य संघटना(WHO) या सगळ्यानांच लागू होतेय.     घरातली माणस 24 तास घरात असल्यामुळे सहाजिकच त्यांच्या खाण्या पिण्याच्या गरजा ,त्यांचा डिमांडस्, घरातली इतर काम करत सगळ्यांना खुश ठेवायची तिची कसरत ,तिने कितीही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला तरी तिचा ही संयम सुटतो,एकटीन हे करन आणि घरातल्या इतरांनीही जबाबदारी जाणीव ठेवून आपणहून यात सहभागी होण, फरक पडतोच.        घरात तिनेच राबायच या पेक्षा प्रत्येकान त्यात सहकार्य केल तर ती करते त्याची जाणीवही होते व त्या कामाच महत्व ही कळत वर सगळ्यांन मधे सहकार्याची भावनादृढ  होते,एकतेने, आनंदाने काम करतांना नाती सुदृढ व्हायला मदतच होते.       बरयाच लोकांनी WHO  ने करोनाला महामारी घोशीत करायला उशिर केला अस म्हटल आहे तर या संघटनेने त्यावर योग्य उपचार किंवा त्याची साथ रोखन्याच्या उपाय योजनांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने वा योग्य वेळीच केला नाही असही काहींच म्हणन आहे.   ...