आपल्या दैनंदीन जीवनात ऐणारया व्यक्ती,प्रसंग भावना ,अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न.
बाबा ची बदललेली रूप
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.
आण
आम्ही आंधळे नी मुर्ख चिकटवले लेबल जाती-धर्माचे अन घेतले झेंडे ,भगवे ,निळे अन हिरवे यातच हरवलो मग------- दिसलाच नाही कावा त्यांचा आपल्याला गुंतवून या गुंत्त्यात ते गले लठ्ठ झाले खाल्ल सार सार काही चारा ,कधि डांबर , कधि रेती ,कधि राशन कधि घर तर कधि शवपेट्या ही शहिदांच्या खाल्ल्या तुकडे टाकुन आश्वासनांचे , घोषणांचे आरक्षणांच्या तर कधि मंदिरांचे आणि पुतळ्यांचे हे टाळूवरच लोणी खाऊ लागले आणि आपल्याला आपल्याच हक्कांसाठी भिकेला लावले किती दिवस जगणार आहोत हे गांधारीच जिन आपल्यातल्याच कुणाला तरी व्हाव लागेल कृष्ण! कली युगातले हे कली आहेत पांढरे कपडे आणि काळी कर्णी व्यवस्था झाली द्रोपदी आपल्यातल्याच काही युधिष्टिरांनी लावला तिच्यावर डाव जागा आत्ता तरी --+++ पट्टया काढा स्वार्थाच्या ,जाती -धर्माच्या खावू नका यांनी दिलेली भेदभावाची गोळी आपल्याच तर मढयावर शेकताहेत ते त्यांची राजकारणाची पोळी
हे फक्त एक चित्र ,माझ्या म्हणन्या चा प्रत्यय यावा व चित्र बघुन वाचायची इच्छा व्हावी म्हणून . आज आपण भारतिय जे आपल्याच संस्कृतिचा, संस्कारांचा भाग आहे तेच अगदि फाॅरेन रिटर्न किंवा तिकडच लेबल लावून येत ते अंगिकारण म्हणजे पुढारले पण किंवा आधुनिक जीवनशैली आत्मसात केली अस मानतो. योगा हा भारताने जगाला दिला अस म्हणतात आणि ते खरच आहे. पण याची ओळख आपल्याला जास्त कधि झाली किंवा तो एक व्यायाम किंवा वर्कआऊट किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा भाग म्हणून आपण केव्हा स्विकारल तर जेव्हा इंटनॅशनल योगा डे साजरा व्हायला लागला तेव्हा .आता काही म्हणतिल कि आम्ही बरयाच वर्षां पासुन करतोय तर ते खरोखरीच जागृत नागरिक म्हणजे काय ट्रेंड आलाय म्हणून तस करतोय अश्यातले नाही तर ते माझ्या आरोग्या साठी उत्तम वा महत्वाच आहे म्हणून . खरतर योगा फक्त काही आसनांन पुरता मर्यादित नाही तर ती एक उत्तम जीवनशैली आहे. पर्यावरण पुरक ,संयमी ,संतुष्ट, प्रेरणादाई ,सेवा वा एंकदरीत स्व:कल्याणातून विश्व कल्याणाकडे नेणारा जीवन मार्ग . ते कस? ते आज नाही परत कधित...
कौन बनेगा करोडपति च्या मंचावर आलेल्या काहि स्पर्धकां पैकी हे दोन शिक्षक ,त्यांची शैक्षणिक पात्रता वाखानण्या जोगी आहे पण तरिही त्यांना त्यांच्या विद्या दानाच्या कार्याचा मोबदला त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणात मिळत नाही. आईवडिलांनी कष्टाने ,आपल्या पोटाला चिमटा देऊन उज्वल भविष्याच्या आशेने मुलांना शिकवले. पण या हाडाच्या शिक्षकांना त्या कामातुन कुटुंब चालवण कठिण होत . मग काही जोडधंदा वा प्रसंगी मजुरी करूनही त्यांना आपल्या कुटुंबाच्य उदरनिर्वाहाला हातभार लावावा लागतो. का हि अवस्था व्हावी ? तर शिक्षण क्षेत्राला नफा देणारा धंदा बनवणारया /समजणारया शिक्षण सम्राटानां जसा विद्यार्थ्यान कडून फी च्या रूपात गडगंज पैसा लाटायचा असतो तसाच शिक्षकाची नोकरी देण्यासाठी त्यांच्या कडून लाखो रूपये घेतले जातात. मग येवढा पैसा देणारा कर्मचारी शिक्षक म्हणून नोकरी करत नाही तर ते पद त्याने विकत घेतलेल असत आणि सहाजिकच त्याला या पैशाच तिळमात्र ही द्यान नसत आणि शिक्षण देण्याची तळमळ तर नसतेच ,ते फक्त मस्टरवर सहि करणारे नामधारी...
Comments
Post a Comment