Posts

Showing posts from 2019

दिल तो बच्चा है जी

      आज ऐक बकरी चारणारी बाई व तीचा मुलगा एका बकरीला पकडायचा प्रयत्न करत होते ,ती कळपा पासून दूर जात होती  तेवढ्यात समोरून एक आई आणि तीची दोन मुल चालत येत होती तर त्यांच्या समोर ती बकरी आली आणि चक्क त्यातील आईने अगदी जीभ बाहेर काढून तीला पकडण्याचा प्रयत्न चालू केला .कधी ईकडे तर कधी तिकडे          दृष्य अगदी सुंदर होत . मुल आपल्या आईला अस बघून हसू लागली.   आपल वय विसरून तीचा तो प्रयत्न नकळत माझ्या ओंठांवर हसू देवून गेला.    निरागस पणे केलेली कृती लोभसच  असते की .       ऐखाद आवडत फळ जस की आंबा  मिटक्या मारत, खाण्यात अगदी तोंड ,हाथ भरवून भारीच वाटत. त्यात लहाणपणी उपभोगलेला आनंद आजही तीच पध्दत( म्हणजे आंबा खाण्यची )बालपणात घेऊन जाते.       झोपलेली व्यक्ती ती वास्तवात रागीट असली तरी निरागस वाटते,मधेच त्या चेहऱ्यावर येणार हसू त्याला क्यूट दिसतोय/दिसतेय अशी कमेंट  देऊन टाकत.      ज्याला गुदगुल्या होतात ते तर बोट लांबूनच हलली तरी हसायला लागतात आणि प्रत्यक्ष गुदगुल्या झाल...

झपाटलेले वेडे

        सकाळी पेपर वाचायला घेतला तर आज" no negative news,positive Monday " या शिर्षका खाली ऐका पानावर जवळ  जवळ सगळ्याच बातम्या म्हणजे माहीती होती , ती आपल्या आजूबाजूला ूचालू असलेल्या निस्वार्थ सेवा करणारया अवलीयांची.              कुणी कचरा वेचणारया मुलानां शिकवून त्यांची शाळेची तयारी करून घेऊन त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देतात.     काही रस्त्याच्या बाजूला   फूटपाथवर राहणारया  मुलानां शिकवतात.     ऐक वेडी मुलानां वाचायला मिळाव म्हणून अफगाणिस्थानात फिरती लायब्ररी चालवते.       काही रस्त्यावरच्या मतीमंद (दिव्यागं) भिकारयानां आंघोळ घालून त्यांच्यावर औषधोपचार करतात.    या पुढे जाऊन काही त्याचा साभांळ करतात. त्याना ऐक सुरक्षीत ,आनंददाई आयुष्य देतात.      काही अवलीया निर्वासीतांच्या वस्तीत त्यांच्या शारीरीक व मानसीक जख्मांवर मलम लावतात.      खेळ व मनोरंजनाद्वारे त्याच्यां जीवनात आनंद आणतात.    इराक,सिरीया ,इस्रायल, अफगाणिस...

Still !अच्छाई जिंदा हैै--

         बरयाच वर्षा पासून दोन धर्मांच्या अस्मीतेचा प्रश्न ठरलेल अयोध्येच" राम मंदीर -बाबरी मस्जीत" प्रकरण एकदाच कोर्टाच्या अंतीम निर्णयाने व आपण सर्व भारतीयांच्या परस्पर सामंजस्याने तसेच सतर्क यंत्रणे मुळे शांततेत स्वीकारल गेल व एकदाच पार पडल अस म्हणायला हरकत नाही.      आज आपल्या सारयां समोर इतर अनेक मुलभूत प्रश्न आहेत त्यात अनेक वर्षांपूर्वीच्या मंदीर -मस्जीत प्रश्नावर भांडून आहेत्यात आणखी भर घालून सामान्य माणसाचे प्रश्न ,समस्स्या वाढवायच्या,त्याच्या रोजीरोटीवर गंडातर आणायच कुणालाही नको आहे .नेहमीच असल्या संघर्षात लोकांना भडकवणारी डोकी सुरक्षीत राहतात पण सामान्य माणस भरडली जातात.   ज्या रामासाठी लोक रक्तपात करायला तयार असतात त्यान तर स्वात:च्या राजपाठावर पाणी सोडल होत ,तो असता तर खरच भांडला असता का?   ज्या मंस्जीदी साठी मुसलमानानां भडकवल जातय तो अल्ला तर माफ करणारा ,दया करणारा ,हिंसा ,खोट, मोह यां गोष्टी निशिध्द माननारा.अस मानल जात या बेसीक गोष्टी सारया नां माहीत आहेत.   कारण अशे बरेच नियम रोज्यांच्या दरम्यान पाळले जातात. एक...

वाटाड्या,(The guide, light house)

            वाटाड्या,वाट दाखवणारा!बस हाच अर्थ आहे याचा. अर्थात आयुष्याच्या वाटेवर चालतानां याला एक वेगळाच ,गहन अर्थ प्राप्त होतो.      जसा अर्जुनाचा वाटाड्या भगवान कृष्ण, ज्याने अर्जुना बरोबर आपल्या सगळ्यानां  " गीते" द्वारे ग्यान देवून कर्माची योग्य वाट दाखवली.  आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक वळणावर एका योग्य वाटाड्याची गरज असते.मार्ग चुकला की सगळच चुकत जात.    आई प्रथम गुरू तशीच ती आपल्या आयुष्यातील पहिला वाटाड्या.रांगायला प्रोत्साहन देण्या पासून ते बोट धरून चालयला तीच तर असते सदा वाटाड्या बनून.पुढे या बालपणातून जरास पुढे याव तर बाबा वाटाड्या असतो, असली दुनियादारी तोच तर शिकवत असतो.      बरयाच लोकांच्या आयुष्यात या दोन वाटाड्यांनी दाखवलेली वाटच अंतिम ध्येया पर्यंत पोहचवते.  पुढे शाळेतले शिक्षक,मित्र वाटाड्याच काम करतात.त्यात कधी रस्तयावर भीकमागणारी मुल किंवा आपल्या उदरनिर्वाहा साठी काही तरी विकणारी ,बुट पाॅलिश करणारी ,कचरा वेचणारी अशे अनेक वाटाडे त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांनी निवडलेल्या स...

दुरितांचे तिमीर जावो.

     दुरितांचे तिमीर जावो |विश्व स्वर्धम सुर्ये पाहो||     किती सुदंर आहे ना ,ग्यानेश्वरांनी पसायदानात लिहीलेल ,माडंलेल हे. खरतर विचार,लिखाण या गोष्टी सुदंर आहेत तर त्या आपल्या सगळ्या साठी महत्वाच्या आणि आपल्या सर्वांच आयुष्य सुदंर करणारया.     सारयांनचा  निर्माता ताे परमपिता परमात्मा ,एकच आहे हे आपण ऐकतो, म्हणतो पण मानत नाही का?      शाळेत असतांना म्हटली जाणारी प्रतिग्या ,"सारे भारतीय माझे बांधव आहेत,--------",किंवा शुभम करोती ,कल्याणम म्हणनारे आपण आपल विश्व इतक संकूचित करून टाकतो की आपल्या उंबरयाच्या बाहेर आपल कुणीच नाही असच वागत असतो.          आपल्या कातडीचा रंगच तो काय वेगळा पण सारेच मानव म्हटले जाणारे दोन पायाचे प्राणी हाडामासाचे ,अंगात लाल रक्त ल्यायलेले,नाक कानाचा आकार वेगळा असला तरी सामान्य पणे त्यांची संख्या प्रत्येकात सारखीच.      तरीही  किती भेदभाव रंगाचा, जातीचा,धर्माचा ,देशाचा. प्रतेक जण ज्या कुठल्या देवाला मानतो तोही सर्वांवर प्रेमच तर करायला शिकवतो,माफ करायला शिकवत...

मायाजाल

   आपल्या देशात सतत कुठल्यानकुठल्या नीवडनुका चालू असतात .त्यात येरवी कधीही तोंड न दाखवणारे मतदार राजाची मनधरनी करतात,पाय धरतात.    त्यात भुलवणारी ,खंडीभर आश्वासन देणारी ,स्वप्न दाखवणारी  भाषण देतात.कधी पैसे , वस्तू,साड्या ,कायम बेहोश करण्या  साठी दारू  , अश्या अनेक प्रलोभनांनी आपल अनमोल मत माती मोल भावात मिळवतात.    पूर्वी पूरूषांना बाटलीत उतरवल की अख्ख घर एकालाच मत द्यायच ,आत्ता बायका स्वतंत्र विचार करायला लागल्यात.या 50% मतदार असणारया भाबड्या  बायकां साठी उमेदवार नवनवे फंडे आजमावू लागलेत.   म्हणजे उमेदवार पूरूष असेल तर त्याची अर्धांगीनी किंवा स्वत:उमेदवार असणारी महीला या बायकां साठी हळदीकुंकू, गरबा,विविध स्पर्धां वा कार्यक्रमांचे आयोजन करते.   या महिलांचे सुप्त गुण जोपासले जातात ,त्यांना एक व्यासपिठ मिळत.मग त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करणारया व्यक्ती त्यांच्या साठी महान वा उत्तम ठरतात.      आपली कुल्फ्या दाखवून बोळवण केली जातेय हे कीत्तेकींना कळतच नाही व कळत त्यांना वाटत मला महत्व मिळतय ते कशा साठी का अस...

मुखवटे

      मुखवटे या शब्बदात बरच काही दडलय.जे आपल्या सर्वंनच्याच आयुष्यात ंवेगवेगळया वळणावर वेगळीच वळन घेऊन येत वा एखाद्या मुखवट्या खालच खर रूप न समजल्याने आपणच आपल आयुष्य त्यात विस्कळीत करून टाकतो.       दुसरेच नाही तर आपणही लहाण पणा पासून वेगवेगळ्या प्रसंगी ,वेवेगळ्या लोकां समोर अनेक मुखवटे लावून वावरत असतो.        आईच लक्ष आपल्या कडे वळवण्या साठी कधी रडक तोंड तर कधी एकदम गोजीर निरागस रूप म्हणजे तीला आपल्याला जवळ घेतल्या शीवाय राहवणारच नाही. न आवडणारया एखाद्या व्यक्ती पासुन तीच्या कडे जायच असल्यास जोरात भोकाड पसरतो.     अश्या अनेक क्लुपत्या आपल्या लहाणपणीच आपण वेगवेगळे मुखवटे लेऊन आईला आपल्या तालावर नाचवत असतो.       पुढे पुढे हे मुखवटे जास्तच बदलत जातात अन आपण खरे कोण हेही कदाचीत विसरायला होत.       वाचनाने समृध्द,प्रगल्भ झालेली मी काही गोष्टी पटत नसल्या तरी तेव्हा समोर आलेल्या व्यक्तीं नुसार माझा मुखवटा बदलते.      मग त्या नुसार कधी उपवास करते,कधी साग्रसंगीत पुजा करते. श्र...

आजीम्या देव पाहीला

Image
     हे व असे अनेक फोटो ,विडीओज पुराच्या दरम्यान समाज माध्यंमावर शेअर केले जात होते.      हा फोटो बरतच काही सांगून जातो .मग ती मंदीर-मस्जीत या दोंघा मधल्या असलेल्या नसलेल्या देव वा अल्लाची सारखी अवस्था व  त्यांना माननारयांची अवस्था,      अन कुठलाही भेदभाव न ठेवता केलेले सैनिकांचे काम.  खरच सँलुट त्या सर्व वर्दीतल्या व सामान्य पण विशेष काम करणारया प्रत्येक माणसाला ज्याने जीवाची पर्वा न करता झोकुन दिले स्वताला या लढाईत लोकांना वाचवण्या साठी.      मिळेल त्या साधना सोबत वा शिवाय अनेक जीव वाचवले. त्यांच्या पर्यंत मदत पोहचवली.   दिवस -रात्र उभ राहुन सावरल अनेकांना .प्रत्यक्ष त्या ठीकाणी काम केल उंटावरून शेळ्या हाकनारया अनेकांनी व्यवस्था,सरकारच्या नावान बोट मोडली पण ज्यांना करायच होत ते आले ,केल सार कुठलाही टेंभा न मिरवता.     आहे च चुक शासनाची पण दोस्त हो  कुणी बुडतय तर वाचवायला उडी घ्यायची सोडुन काठावर बोंबामारत बसायच का?    असो ते त्यांच्या कुवती प्रमाणे वागतात पण या सगळ्या मानवाच्य...

जागते रहो

          गेले पंधरा दिवस आपण सगळे वेगळ्याच भयाने ग्रासले आहोत. पावसाची आतुर तेने वाटपाहणारे व मग त्याच्या येण्याने सुखावलोही.तो कुठे जास्त ,कुठे कमी तर कुठे अजीबातच नव्हता.        पण हळुहळु त्याने रौद्ररूप धारण केले अन गालावर हसू आणनारा तो डोळ्यात ले अश्रू बनून बरसू लागला.       अनेक ठिकानी थोडा अंदाज असल्याने (कधी कधी हवामान खात्याचे अंदाज असतात बरोबर) हवे ते नीयोजन केले गेले,लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलवने,त्यांच्या खाण्यापिण्याचा व्यवस्था , तात्काळ सेवांची उपलब्धता अस सगळ.         पण--------  काही ठिकाणी अंदाजच न आल्याने रांत्रीतन त्याने सगळा गाव कवेत घेतला ,जिथे लोक तर झोपले होतेच पण शासन ही निंद्रेत असल्याने सगळच त्याच्यात सामाउन गेल.       रस्तोरस्ती पाणीच पाणी        घरात दारात      शेतशिवारात     सगळी कडे पाणीच पाणी    काही माणस गेली उंच जागेवर पण जनावरांच काय ? त्यातली काही वातवली ,तीही घराच्या गच्ची वर नेउन. ...

भुरया

                             भुरया एक हीरो            भुरया खरच भुरया केसांचा ,रंगाने गोरा .तो राजबिंडा आहे दिसायला पण त्याच्या कळपात तो वेगळा म्हणुन त्याच नाव भुरया. रस्त्याच्या बाजुला राहणारया पाट्या- वरवंट्या वाल्या भटक्या जमातीच हे लेकरू.       जस रूपवेगळ तच त्याच वागण,विचारही वेगळे.याला शासनाच्या शिक्षणा बाबतच्या धोरणा मुळे शाळेत जायला मिळाल.शाळाबाह्य मुलानां शाळेकडे आणायच म्हणुन शिक्षक त्याच्या आईवडीलांना समजावुन त्याला शाळेत घेउन आले.      त्याची शाळा त्याला शिकवायच म्हणुन चालु झाली असली तरी त्याच आणखी एक कारण होत ते म्हणजे त्याला एकवेळ शाळेत जेवायला मिळणार होत शिवाय स्काँलरशीप ही मिळणार होती.        भुरया एकदम चुणचुनीत मुलगा,काही दिवसातच त्यान सगळ्यांची मन जिंकली.त्याची निरीक्षण क्षमता उत्तम होती म्हणुनच की काय तो लवकरच फोटोग्राफर झाला .शाळेत कुठल्याही कार्यक्रमाचे फोटो काढायला शिक्षक आपला कँमेरा त्याला देउ लागले.  ...

मारीया एक बेट

                      मारीया         आज कपाट आवरतांना एक पिशवी सापडली.तुम्ही म्हणाल काय खास आहे  त्या पिशवीत?    हो खासच आहे ती कारण ती मारीया आईने शीवली आहे जि दोन्ही पायांनी अपंग आहे शिवाय दोंन्ही डोळ्यांनी अंध.     एवढच नाही तर ती राहते एका अनाथ आश्रमात.  तर मारीया मला भेटली ती औरंगाबादच्या मदर टेरेसा  आश्रमात ,जिथे अंध -अपंग,निराधार,वृध्द,मानसिक वृग्ण अशे सगळे पिडीत एकत्र राहतात एका परिवारा सारखे.     मी मधे मधे तिथे जायचे,थकलेल्या मनाला नवी उभारी मिळायची .ती सगळी इतकी दु:ख , अडचनी असुनही आंनदात राहायची .त्यांना भेटलकी खुप प्रेम मिळायच .त्याना माझ्या कडुन फारस काही मिळायच नाही फक्त मी त्यांना भेटायला आलेय यातच भारी वाटायच कारण त्यांचे नातेवाईक त्याना भेटायला यायचे नाहीत आणि माझ्यात कुणाला लेक दिसायची,कुणाला बहीण तर कुणाला आई छोटे छोटे हट्ट करायला.        मारीया याच्यांत जास्त जुनी मेंबर कारण ती घरच्यां सोबत राहायची तेव्हा पासु...

त्यांच पालकत्व

                हेही आई बाबा       आज सकाळी अनेक पक्षांचा गलका ऐकु येत होता,बराच वेळ ,झाला   तरी थांबायच नाव नाही,एरवी कानाला गोड वाटनारी त्यांची किलबील वेगळीच वाटत होती. मग न राहून आले बाहेर, तर मनीम्याँव दबा धरुन बसली होती,तिचा एकंदरीत पवीत्रा बघता तिला तिची शिकार समोर दीसली होती आणि त्या शिकारयाच्या भीतीने समस्त पक्षी फँमीलीज आर्त होऊन मदती साठी पुकारा करत होत्या.     मनी   ला हूसकाऊन लावल तर ,थोडी शांतता झाली. पण मी तिच्या शिकारी वृत्तीला ओळखुन होते कारण या आधीही तीच्या तोंडात पक्षी पाहीलेत ,बागेत अनेक दा  पण तेव्हा त्यानां वाचवन शक्य झाल नाही ,आज मात्र मी त्या खाली पडलेल्या पिलाला वाचवल.       त्याला अजुन उंच उडता एत नव्हत, म्हणुन मी त्याला उचलुन  मला सेफ वाटल त्या जागी ठेवल.      तर महाशय खाली हजर.पण आता त्चाची जागा बदललेली होती.पण त्याच्या आई बाबांना अजुन ते सापडल नव्हत.ती दोघही त्याला पुर्वीच्या जागी शोधत होती, तो आर्त स्वर ,ते तिच सैरभैर होण...

अनोखी अदाकारी

Image
पावसाळ्यामुळे संध्या जोरात आउटींग सुरु आहे.मग काय डोळ्यांना अनोखी मेजवानी,हो हो निसर्ग वेड्या लोकांना विचारा की पंचपकव्वान्वाच ताट बघुन एखाद्या भुकेल्या ला होतो तसाच आनंद यांनाही होतो. चहुकडे ,"हिरवे हिरवे गार गालीचे हरीत तृनांच्या मखमालीचे" अस कवी मनाला वाटत.तुमची दृष्टी तुम्हाला नव्या नव्या विश्वाची सफर घडवुन आणते.कधी भरगच्च हीरवळ ,कुठुन प्रकाशालाही आत डोकावयाला जागा नसते.तर कुठे विखुरलेले सारे अंतरा अंतरावर खोखाचा डाव मांडलाय जणु. कुठे ऊभेत दोन झाड एकमेकात गुरफटलेल्या प्रेमी युगुला सारखे आलींगन देत. कुठे तो एकटाच ,निशपर्ण झालेला काळा ,कुळकुळीत मोठासा वृक्ष नटसमराटा सारखा आपल्या लोकांनी अडगळीत टाकलेला. कुठे भली मोठ्ठी फँमेली पिकनीक ला आल्या सारखी गोलरिंगण करुन बसलीय जनु अस काहीस वाटाव अशी वृक्ष रचना ,दोन तीन मोठे वृक्ष त्यांनच्या मधे छोटि छोटी झाड तर कुठे कुठे ईवली ईवली रोपटी  लहान लेकरां सारखी. कांहीची एटच न्यारी जनु ऐखादी सुदंरी फोटोसाठी पोज देतेय,तर ऐखादी अंगडाई घेतेय. ऐरवी काँमन वाटनारया कडुलिंबालाही वेगळच रुप आलय ,वर वर आलेल्या कोवळ्या पांनाचा रंग काही व...

पिल्ल सोनुली .

पाहीली का पिल्ल.किती नाजुक आहेत ना इवल्या इवल्या चोची मान वर करुन काही तरी आई खायला घालेल या आशेने वर करताहे. खरतर त्याच्यां घरट्यात फक्त आईच येते पण माझ्या त्यांना बघन्याच्या ओढीने मी त्यांच्या घरट्याच्या अगदी जवळ गेली आणि हा नजारा पाहीला.खरतर आई सोबत त्यांचा फोटो मला काढायचा होता पण त्या बुलबुल ला अजुन माझी भीतीच वाटते कदाचीत ,पण मी तीचा विश्वास नक्की जींकेल एक दिवस कारण अशीच एक चुटुकली काळी चिमणी अगदी माझ्या जवळ बसत असते ,कधी एकाच पायावर साधना चालु असते तीची. पण तीच घरट मात्र वर बनवलय तीन. कधीकधी वाटत आपण ते आपल्या जगात आलेत की आपण   त्यांच्या . ही आपली वा त्यांची अशी करता येईल का? कारण त्यां च्या आपल्या आजूबाजुला असन्याने जीवंत पणाचा अनुभव येतो त्यांचा चिवचीवाट,केकीळेच कुहुकुहु,पोपटांचा आवाज कस वेगळ पण मधुर संगीत.त्यांचे रंग ,त्यांच उंचच उंच उडन.हे सगळ आपल्याला नव्याचा शोध घ्यायला प्रेरीत करत.अन ईवल्याश्या चोचीने त्यांनच घरट बनवन,त्यांच्या पिल्लांच संगोपन हेही आपल्या आळशी जीवांना शीकवण देणारच आहे की. म्हणुन बहीनाईच्या कवितेत सुगरन आपल कौतुक करुन घेतेय. 

Thank you आई बाबा

                    Thank you आई बाबा आज काही Thanks giving day नाहीय. मग तुम्ही म्हणाल मग हे थँक यु  कशा साठी? खर तर आपण जन्माला आल्या पासुन किंवा त्याही आधी पासुन आई बाबा आपल्या साठी काही ना काही करतच असतात.त्यांच्या दैनदीन आयुश्यात बाळा साठी म्हणुन आधीच बरीच तडजोड ,जुळवाजुळव चालु असते. लहानपणी त्यांच्या सावलीत आपली वाढ होत असते ,तेव्हा एखाद्या नाजुक झाडाला जसे प्रखर उन सोसवनारे नसते  अगदी तसेच आपल्यालाही प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष सोसनवनारा नसतो. पण हळुहळु ते आपल्याला  बाह्य जगासाठी तयार करायला लागतात.त्याचाच भाग म्हणुन कधी त्याची शीस्त असते,कधी कधी आपल्या नकोत्या हट्टांना नकार असतो. या सगळ्यात त्यांच आयुश्य आपल्या अवतीभवती च असत . आईच आपल्या साठी तिच्या वैयक्तीक बाबी कडे दुर्लक्ष  होत,जणु ती फक्त आई च होउन राहते तर बाबांच प्लानींग आपल्या शिक्षणा पासुन तर लग्णा पर्यंतच.त्या साठी जीवाच रान करत असतो बाबा. मग आपण एक स्वतंत्र झाड होउपाहतो त्यात  मधे मधे ऐणारया वादळात परत आपल्याला त्यांच्या आधाराची ग...

आम्ही उद्योगीनी

                         आम्ही उद्योगीनी चाळीशीतल्या पाच सहा बायका भली मोठ्ठी गाठोडी घेउन गाडीत चढल्या.गाडी सुरु होताच त्या मोठ्या गाठोड्याच्या उतरंडीतुन एक एक गाठोड काढुन सीट खाली ठेवत होत्या. मी जरा खाली वाकुन पाहत होते तर म्हटली चप्पल बाजुला ठेवलीय. त्या सगळ्याच दारा जवळ बसल्या होत्या .थोड्या वेळात सगळ्या आपल्या शिदोरया काढुन  जेवाय ला बसल्या.हसत  खीदळत आहे ते वाटुन खात होत्या. हे सगळ दारा जवळच्या सीटवर बसल्या मुळे दिसत होत.माझ निरीक्षण चालुच होत . थोड्या वेळात एकीला फोन आला ती हसत लाजत बोलत होती,मला ती काय बोलतेय ते  ऐकु येत नव्हत पण कदाचीत तीला तस वाटत असाव कारण ती बोलता बोलता माझ्या कडे बघत होती. पुढच्या स्टेशन ला दोघांनी केळीच्या पानाचे गठ्ठे आणले,ते देतान्ना त्याने तीला पुढची आँर्डर असली तर कळव अस सांगीतल. ती परत सीट खाली काही तरी करत होती मी आपल सहज विचारल ,"उतरायचय का?" तर ती म्हणाली ,"नाही ताई ,आत्ता डायरेक्ट कल्याण " मला आश्चर्यच वाटल कल्याण ला त्या बेलाची पान आणि केळीची पान न...

स्वावलंबन

                            स्वावलंबन आज ऐक पार्सल ऐणार होत.म्हणुन वाटच पाहत होते.तर दुपारी अडीच तीन च्या दरम्यान फोन आला ,फोन करनारया व्यक्तीने नाव विचारून चौकशी केली व मी पेट्रोल पंपा जवळ  आहे कुणाला तरी पाठवा अस म्हटली.तर मी पार्सल घ्यायला म्हणुन गेले ,अशातच त्याचा परत फोन आला ,तुम्ही कुठे आहात? मी तीन चाकी सायकल  वर आहे. खरच ऐका तीनचाकी सायकलवर  साधारन तीशी पस्तीशी तली व्यक्ती होती. आत्ता कळल ती घरा पर्यंत येता येणार नाही अस का म्हटली.पण त्याने तेव्हा अस काही कारण सांगीतल नव्हत,आपल्या लाचारीच प्रदर्षन अजीबात नव्हत. स्वावलंबी ,स्वाभीमानी  व्यक्तीच अस करू शकते. आता कळतय त्याना दीव्यांग का म्हणायच ते . खरच जीथे धडधाकड माणस अनेक कारण सांगुन आळशीपणा करतात तिथे ॆअशे स्वाभीमानी ,मेहनती लोक आपल्या   वर्तनातुन आपल्याला स्वावलंबनाचे धडे देतात.

हमारी आशा

                 हमारी आशा "ताई मी उद्या जरा लवकर येइल" आशा बाई भांड्याची पाटी  ठेवता ठेवता सांगुन गेली. माझ्या कडे धुनीभांडी करणारी आशा ,हसरी आणि संतुष्ट वाटनारी. ऎकदा तीच्या ऐवजी मावशी आल्या म्हणजे तीची आई ,मी सहजच विचारल ,आज आशाबाई नाही आल्या ? मावशी म्हणाल्या ,"ती अआजारी आहे .दवाखान्यात जायच  नाही म्हणते ताई.काय व्हायच ते होऊदे" अस का म्हणत असेल म्हणत असेल असा विचार मनात आला तोवर मावशी पुढे म्हणाल्या ताई ,जशी माघारी परत आलीय तशी खाली मान घालुन काम करते,कुणाशी बोलन नाही,कुठे जान नाही. सासरच्यानी तीला सोडुन दिलय . हे ऐकुन जरा धक्काच बसला.नाही म्हणजे ही काही नवीन घटना नाहीय,अस आजुबाजुला चालुच असत पण आशाबाईच्या बाबतीत एकुन आश्चर्य वाटल कारण गेले सहा महीने काम करतानां कधीच ती नाराज,निराश दिसली नाही. आपल काम भल आणि घर भल. खरच एरवी नवरयान टाकलेली बाई म्हणजे दु:खी चेहरा ,उदास  अस काहीस चित्र असत.पण आशाबाई याला अपवाद आहे .ती धुनीभांडी करते,मंगल कार्यालयात कामाला जाते,शेतीतली कामही करते. यातुन मिळनारा पैसा बँक...

सहज सहयोग

                            सहज सहयोग पर्वा सोमवार ,1तारीख त्यामुळे बँकेत बरीच गर्दी होती.पेन्शन घेणारे,पगारदार,श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी,बचतगट या सर्वांचीच गर्दी. प्रत्येक काऊंटर वर लांबच लांब रांग.यातच शिकलेल्या लोकां बरोबर अगदी अंगठा बहाद्दर म्हणजे काही खरोखीच अशिक्षीत तर काही व्यवहार ध्यान नसलेले.मज्जा ऐत होती निरीक्षण करन्यात.काही हसरे चेहरे.काही काळजीत पडलेेले,काही गोंधळलेले काही निर्विकारी.अश्यातच ऐका काऊंटर वर ऐक स्लीप घेउन ऐक तिशीतली बाई ॆआली व अंगठा द्यायचाय म्हटली ,पलीकडच्या बाईनी किती पैसे काढायचे ?अस विचारल आणि हवी ती खात्री पटल्यावर त्यांनी स्टँम्पपँड पुढे केल त्या बाईंनी अंगठा लावला व पुढच्या कांउटरवर गेल्या. नंतर बँकेच्या साहेबांच्या केबीन बाहेर त्या बाई आणखी दोघीं सोबत दिसल्या. आत जान्याचा प्रयत्न करणारया त्याना साहेबांनी हातानेच थांबवल.नंतर  साहेबांनी आत बोलवुन विचारले काय काम आहे? तर त्यांनी तीच स्लीप दाखवली व त्यावर त्यांची सही हवीय.त्यांनी ती स्लीप बघीतली व त्यांच्या सगळा प्रकार...

तीची प्रश्नार्थक नजर

             स्कुबी   स्कुबी काही दिवसां साठी आलेल  कुत्र्याच 3/4 दिवसाच पिल्लु. या अनाहुत  पण गोंडस पाहुन्याच  घरातील  सगळ्यानीच  स्वागत केल.बाळच ते मग माणसाच  असो की कुत्र्याच गोजीर  adorable,cute . सगळे अगदी तिची काळजी घेत होते  .तीच खाणंपिण ,आघोळ ,तीला फिरायला नेणं सगळच. कधी कधी तिच्या साठी खास अस  बोबिंल घरात  यायला  लागल.दिवसागनिक स्कुबडु मोठी व्हायला लागलि. अन  वयात आलेल्या  मुलिनां  जस  मुल  त्रास द्यायला लागतात तसच काहिस स्कुबीच्या बाबतीत व्हायला लागल. आजुबाची कुत्री फाटक उघड असल की आत यायला लागली,कधी कंम्पाउड ओलांडुन त्याचं तीला  त्रास देण  सुरु झाल. या सगळ्यात  ती  आई झाली .तिच वय लहान अन अश्यात  हे सगळ .तीनच तीची दोन पिल्ल खाल्ली हे न बघावस वाटनारी मी एका अर्धवट वाढलेल्या पील्लाला बाहेर टाकुन आले.या सगळ्या वेदनादाइ कार्यक्रमात  पार्कींग मधे रक्तच रक्त ,तिच्या अस्वस्थतेत झाडांची माती उकर लेली. अस सगळ बघुन यांनी त...

क्रिकेट फिवर

Image
गल्ली ते दिल्ली👉 आपण भारतीय क्रिकेट वेडे आहोत.अगदी लहान,मोठे पुरुषच काय स्रीया ही सामने अगदी डोळ्यात तेल घालुन बघतात.हो पण स्रीया फक्त भारत खेळत असेल तर जास्तच--- आज सहजच पावसाची मजा घेत होते बाहेर बसुन तर आऊट आऊट म्हनुन गलका चालु होता. बँटिग करणारा विरुध्द इतर.मग अनेक नियम सांगुन,ठरलेल्या ठिकाणी गेला की आऊट,इकडे,चौकार आणि इकडे छ्क्काअस करत करत शेवटी त्या बीच्चारयाला बँट सोडावि लागली.  पावसाच्या बरसनारया धारां सोबत या धावाही चालु होत्या. आता कुनाचि तरी आई हाका मारायला लागली,पावसाचा जोर जरासा वाढलाच होता त्यात अंधार पडायला लागला. परत एकदा आई ओरडते पण  तिच्या हाकेला ओ -- ही न आल्यामुळे ती माऊलि प्रत्यक्ष हजर. आता मात्र सामना थांबवावाच लागला. असा गल्लीतला सामना पावसा मुळे नाही तर आई मुळे थांबला अन कुणी विराट ,कुणी धोनि,कुणी धवन तर कुणी बूमरा उद्या च्या प्राँमिस सोबत पँवेलीयन 😄म्हणजे घरी गेले.

ओंजळ

                        ओंजळ आज अखेर तो बरसला,अन तनाला,मनाला,धरनीला गारवादेवून जरा शांत झाला. खरतर गेले 3/4 महीने आपण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आला,अन त्यान जिंकुन घेतल,असा पाऊस😌 खर तर तो येतोच थोडा लवकर,कधि थोडा उशीरा,कधि जास्त,कधी थोडा. हा निसर्ग मोठा दाता आहे  तो सकाळच्या प्रकाशा पासुन, रात्रीच्या सुखद विश्रांती देणारया अंधारा पर्यंत, जीवन देणारया पाण्या पासुन हवा देणारया वारया पर्यंत, चिवचिवनारया चिमणी पासुन गरजनारया सिंहा पर्यंत, जन्मा  पासुन पोषन करत अखेरिस तिरडी वरच्या लाकडा पर्यंत तो सावली  सारखा      ----- नाही पण तीही कधीतरी आपली साथ सोडतेच पण तो असतोच आपला सखा, मायबाप . आज जगभर दुष्काळ,प्रदुषण,वातावरणाचा असमतोल यावर ओरड होतेय,अनेक उपाय सुचवले जाताहेत पण याला कारण आपणच, भरभरुन देणारया या निसर्गाला चहुबाजुने ओरबाडले आहे. आत्ता   त्याच्या कडुन दात्रुत्व शिकणारया आपली त्याला  देन्याची वेळ आलीय. खर आपली लायकीच नाहीय त्याला काही देण्याची पण आपल्या साठीच आपण हे...

ती लेकुरवाळी

ताई मावशी म्हणतात तिला सगळे. मध्यम चनिची ,साधि राहनी ,सतत हसरा चेहरा व समोरच्या ला मी आहे अस आश्वासन. खर तर ती ऑल राऊंडर .संस्कृत उत्तम, अध्यात्मिक वाचण भरपुर म्हणजे त्यातील गाढा अभ्यास , सतत रेडी टू हैल्प. तीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण ती कधि डगमगली नाही.ती आम्हा सर्वा साठी एक विद्यापीठ आहे खरंच. कारण ती तीच्या सहज वागण्या तून आपल्या ला शीकऊन जाते ते धेर्य,सहनशीलता,साधेपण,विश्वास ,आणि त्याग मग तो स्वताच्या कुठल्या ही सुविधांचा असो नाही तर ती ने केलेल्या कामाचा.क्रेडिट ती कधि घेत नाही आणि दाखवतर मुलीच नाही. ती उत्तम कौन्सलिग करते.कारण ती जे सागंते ते कुणालाही पटते मग ती सुन असो कि लेक. ती प्रत्येकवेळी असते च ,म्हणजे लग्नं असो बाळानंतपन असो,मरण असो की आजारी व्यक्ती ती असली की घरातली स्री निशींत. आहे ना ताई मग ____ तुझी सावली अशीच आम्हां लेकरानवर राहूदे आम्हा सगळया  लेकराची माय.

तो जेव्हां तो बाप होतो

आज तिच्या साठी तो चा लेख वाचला.मग ती ही तिच्या जीवनात आलेल्या त्या ला आठवयला लागलि .जीवनात अनेक टप्प्यांवर भेटलेला तो ,कधी चांगला कधी वाईट. कधि ओळखीचा कधी अनोळखी. यातच ती पोहचली एका अन्धारया भयानक रात्रीत. दहा वर्षापुर्वी  पावसाळ्यात ती जीवनाला समपवनया साठी सिग्नल नसल्या मुळे  थांब लेल्या ट्रेन मधुन उतरून चालायला लागते .पावसामुळे झालेल्या चिखल तुडवत ती शेत ओलांडून रस्त्यावर चालत राहते.थोडं स अंधारल मग ती परत रेल्वे च्या पटरी जवळ येते .आपण कुणा ला दिसणार नाही याचि खबरदारी घेत झाडाच्या आडोशाला बसते. आज ती स्वताला संपवून टाकण्या च जणू ठरऊन च आलेली असते. त्यातच तो हातात कंदील घेऊन पटरी ची रीतसर पाहनी करतो,ईकडे तिकडे बघत येनारया गाडी ला सिग्नल द्यायला जातो. ती त्या आलेंल्या गाडी खाली स्वताला झोकून देते. पण ती फ़क्त जख्मी हाऊन फ़ेकली जाते. आता ति तशीच पटरिवर बराच वेळ पावसात भिजत पडली होती. तो परत आला. हातात कंदील घेऊन पटरीवर फिरत होता. त्याला थोडं पूढे कुणितरी पडलयं अस वाटल. तो थोडा जवळ आला,कंदिल आणखी जवळ नेऊन बघू लागला. आत्ता त्याला ती दिसली.संपुर्ण भिजलेली,जख्मी. त्...